पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दात साफ केल्यावर दात ढिल्ले होतात का किंवा दातांना काही ईजा होते का?

प्रश्न - दात साफ केल्यावर दात ढिल्ले होतात का किंवा दातांना काही ईजा होते का? उत्तर - नाही. स्पष्टीकरण - दात साफ केल्यावर अस दात हलल्या सारख काही दिवस रुग्णांना जाणवत फक्त, दात ढिल्ले होत नसतात. दातांवर आणि दातांमध्ये घाण (Calculus) खूप जास्त जमलेली असेल तर त्या घाणेची रुग्णांना त्यांच्या जिभेला, हिरडीला आणि दातांना सवय झालेली असते. ही अशी सवय झाल्यामुळे ती घाण काढल्यावर काहिदीवस रुग्णांना त्याठिकाणी काहीतरी वेगळं जाणवत, दातांमध्ये गॅप जाणवतो आणि ह्याच रूपांतर रुग्णांना दात हलण्याप्रमाणे जाणवण ह्यात होत. ही घाण काढणं खूप जरुरी असत, ह्या घाणी मुळे हिरडीला दाताला त्रासच होत असतो, परंतु हा त्रास रुग्णांना दुखत वैगरे काही नसतो. ह्या घाणी मुळे पुढे चालून हिरड्या कमकुवत होतात आणि दात हलायला लागतात, त्यामुळे वेळोवेळी ही घाण मशीन ने साफ करुण घेण जरुरी असत जेणेकरूनन दातांच आयुष्य वाढेल आणि हिरड्या निरोगी राहतील. काही काही रुग्णांमध्ये दातांवर घाण (Calculus) खूप जास्त प्रमाणात जमलेली असते. अश्या रुग्णांच्या दातांच्या सपोर्ट ला असलेली हिरडी आणि जबड्याच हाड खूप जास्त झिजलेलं असत आणि ह्याठिकाणी ...

डेंटल ट्रीटमेंट्स कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत करणे शक्य आहे का?

डेंटल ट्रीटमेंट्स कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत करणे शक्य आहे का? हो शक्य आहे. डेंटल ट्रीटमेंट्स कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत करणे अगदी शक्य आहे. कस ते सांगतो पहा. डेंटल ट्रीटमेंट्स चा जास्तीचा खर्च आणि जास्तीचा वेळ हा मुळात येतो तो रुग्णांच्या त्यांच्या दातांच्या आणि हिरडीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि ह्या बद्दलच्या अज्ञानामुळे. दातांचे आणि हिरडी चे आजार हे अचानक एकदम क्वचितच येत असतात. जवळपास प्रत्येक आजारात काही अवस्था असतात जस की प्राथमिक अवस्था, मधली अवस्था, आणि शेवटची अवस्था. दातांचे आणि हिरडीचे आजार हे जर प्राथमिक अवस्थेत जर उपचार करून घेतले तर ते मधली आणि शेवटची अवस्था गाठतच नाहीत. ह्या पहिल्या अवस्थेतील आजाराच्या उपचारासाठी अर्थातच खर्च आणि वेळ खूप कमी लागत असतो आणि मधल्या आणि शेवटच्या अवस्थेतील आजाराच्या उपाचारासाठी खर्च आणि वेळ भरपूर लागत असतो. रुग्ण दात दुखल्याशिवाय किंवा दात हलत असल्याशिवाय कधीही दवाखान्यात जात नाहीत आणि ह्या दोन्ही त्या त्या आजाराच्या शेवटच्या अवस्था आहेत. दात दुखण्याची पहिली अवस्था ही दाताला छोटीशी अगदी कमी कीड लागण्याची असते जी की ब...

दात काढल्यावर डोळ्यांना धोका होतो किंवा नजर कमी होते.

दात काढल्यावर डोळ्यांना धोका होतो किंवा नजर कमी होते. हा एक सर्वसामान्य गैरसमज आहे लोकांमध्ये. आम्हास दर दहा पैकी आठ जण हमखास हा प्रश्न विचारत असतात. अर्थातच हा फक्त गैरसमजच आहे, ह्यात तथ्य काहीच नाही. हा असा गैरसमज उद्भवण्यामागे हे एक कारण असू शकते की मानवाच्या उतार वयात पहिले दातं हलून पडायला लागतात आणि नंतर माणसाची दृष्टी कमी व्हायला लागते, ह्याकारणास्तव माणसांनी दात पडण्याचा आणि नजर कमी होण्याचा संबंध जोडला असेल. अजून एक कारण अस असू शकत की वरच्या जबड्याच्या दात काढत असताना जी काही स्थानिक भूल दिली जाते तिचा बधिरतेचा असर डोळ्यांच्या खालच्या पापण्यापर्यंत पोहचत असतो त्यामुळे पण लोकांनी दातांचा आणि डोळ्यांचा संबंध जोडला असेल. तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीय दातांचा आणि डोळ्यांचा. आम्ही सतरा ते अठरा वर्षे वयाच्या मुला मुलींचे दात काढत असतो त्यांना दातांची पिन बसवल्यावर तेंव्हा त्यांच्या डोळ्यावर कसलाही परिणाम होत नाही. बरेच जण ह्या भीतीपोटी दातांच्या दवाखान्यात येन टाळत असतात आणि त्यांची ट्रीटमेंट लांबवत असतात. ग्लोबल डेंटल हॉस्पिटल.